-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉
मुंबईने खूप सोसले आहे आणि अनुभवले आहे. स्वातंत्र्यपूर्व मुंबई आणि स्वातंत्र्योत्तर मुंबईत खूप बदल झाला. मुंबईची अगदी मिसळ की भेसळ झाली, असेही तिच्याबाबत बोलले गेले. पण या मुंबईतून स्वातंत्र्य चळवळीचा हुंकार उठला, संयुक्त महाराष्ट्रासाठी वज्रमूठ उगारली गेली. या मुंबईने अनेक चळवळी, मोर्चे पाहिले; पण आता नव्या स्वातंत्र्यासाठी याच मुंबईत सप्टेंबरमध्ये स्लॅट वॉक म्हणजेच, बेशर्मी मोर्चा निघणार आहे.
पाश्चात्य देशांतील अनेक शहरांतून फिरलेला हा बेशर्मी मोर्चा आपल्या देशाच्या राजधानीत, दिल्लीतही नुकताच निघाला होता. दिल्लीपूर्वी हा मोर्चा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही निघाला होता, परंतु त्याला इतकं महत्त्व मिळाले नव्हते. कारण जेव्हा हा मोर्चा भोपाळमध्ये निघाला होता, तेव्हा हा आपल्या मीडियासाठी अनाकलनीय शब्द होता. दिल्लीपर्यंत पोहोचता-पोहोचता स्लॅट वॉक आणि बेशर्मी मोर्चा यासारखे शब्द नीट समजू लागले होते, म्हणूनच त्याने दिल्लीच्या बेशर्मी मोर्चाला जास्त महत्त्व दिले. आता सप्टेंबर महिन्यात होणार्या बेशर्मी मोर्चाचे नेतृत्व ती मॉडेल करणार आहे, जिने विश्वचषक क्रिकेट दरम्यान असे म्हणून धक्का दिला होता की, जर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला, तर ती स्टेडियममध्येच आपल्या अंगावरील सर्व कपडे उतरवून नग्न होईल.
बेशर्मी मोर्चाच्या रुपाने त्या मॉडेलच्या हाती लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणखी एक शस्त्र लागलं आहे. काहीही असो, यात शंका नाही की, जगभरच्या महिलांची अवस्था सारखीच आहे. महिला अन्याय, अत्याचाराने पिचलेल्या आहेत. जरी आपण पाश्चात्य देशांचा अपवाद केला, तरी जगाच्या इतर भागांत महिलांची अवस्था ठीक नाही. मुस्लिम देशांत एखादा अपवाद सोडल्यास, सर्व ठिकाणी महिलांबरोबर पशुतुल्य व्यवहार केला जातो. भारताबाबत बोलायचे तर आपला देश जगातील असा चौथा देश आहे की, जेथे महिलांबरोबर सर्वाधिक दुर्व्यवहार केला जातो. महिलांना देवी समजणार्या भारतीय संस्कृतीत त्यांना विविध अन्याय, अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे, यासारखा दुसरा विरोधाभास नसावा.
अजून असं कोणतंही सर्वेक्षण झालेलं नाही, परंतु असे निश्चितपणे म्हणता येऊ शकेल की, भारतात जितके चुटकुले प्रचलित आहेत, त्यातील पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांवरच बेतलेले असतात. हीच मानसिकता विकृत बनत इथपर्यंत आली आहे की, देशाची राजधानी दिल्लीदेखील महिलांसाठी सुरक्षित नाही. एका अंदाजानुसार दिल्लीमध्ये रोज सात महिलांवर बलात्कार होतो आणि छेडछाडीच्या घटना इतक्या आम आहेत की, एक महिला जर चार तासांसाठी घर अथवा कार्यालयाबाहेर राहिली, तर तिली येता-जाताना कमीत कमी दोनशेवेळा पुरुषांच्या विकृत शेर्यांना तोंड द्यावे लागते. ही दिल्लीतीलच परिस्थिती नाही, तर संपूर्ण देशाची आहे. मुंबईही याला अपवाद नाही.
कार्यालयांत महिलांचे शोषण होते, तर घरांतही तेच होते. कन्या भ्रूणहत्या तर याची चरमसीमा आहे, यात सुशिक्षित आणि सधन कुटुंबंही सामील आहेत. एकीकडे समाजात जितके अपशब्द प्रचलित आहेत, ज्यांचा वापर पुरुष आपसातील भांडतात करतात, ते सर्व महिलांना अवमानित करणारेच असतात, तर दुसरीकडे महिलांविरुद्ध वापरले जाणारे अपशब्द आणि त्यांना केले जाणारे अश्लील इशारे मनोरंजनाचा पर्याय बनले आहेत. चित्रपटांत अधिकांश हेच असतं. तसेच पुरुष महिलांना सल्ला देतात की, त्यांनी कोणता पोशाख करावा आणि करु नये. महिलांची कोण छेड काढतं? पुरुष. त्यामुळे पुरुषांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, महिलांचा आदर करणे शिकले पाहिजे, परंतु ते करतात उलटं. ते महिलांना सांगतात की, त्यांनी काय घालावे आणि घालू नये. या सर्व बाबींतून महिलांची स्थिती किती दयनीय आहे, याची जाणीव होते, परंतु ही स्थिती बदलण्याचा उपाय बेशर्मी मोर्चासारखे कार्यक्रम असू शकत नाही. बेशर्मी मोर्चाने महिलांच्या प्रश्नाविषयीचे गांभीर्यच नष्ट होते आणि त्यात केवळ दिखाऊपणाच येतो. महिलांना बेशर्मी मोर्चा नाही, जागृती मोर्चाची आवश्यकता आहे. यासाठी महिलांनी एकजूट व्हावे आणि त्या सर्व विसंगतींविरुद्ध आवाज उठवावा, ज्यांना पुरुषांनी महिलांना दुय्यम बनवण्यासाठी निर्माण केलं आहे. कन्या भ्रूणहत्या, ऑनर किलिंग, हुंड्यासाठी छळ यासारख्या कृत्यांविरुद्ध एकजूट होऊन आवाज उठवला पाहिजे, तरच निश्चितपणे ही परिस्थिती बदलेल. स्लॅटवॉक म्हणजे, बेशर्मी मोर्चा शहरी महिलांचे फॅड आहे, याने काही साध्य होणार नाही.
मुंबईने खूप सोसले आहे आणि अनुभवले आहे. स्वातंत्र्यपूर्व मुंबई आणि स्वातंत्र्योत्तर मुंबईत खूप बदल झाला. मुंबईची अगदी मिसळ की भेसळ झाली, असेही तिच्याबाबत बोलले गेले. पण या मुंबईतून स्वातंत्र्य चळवळीचा हुंकार उठला, संयुक्त महाराष्ट्रासाठी वज्रमूठ उगारली गेली. या मुंबईने अनेक चळवळी, मोर्चे पाहिले; पण आता नव्या स्वातंत्र्यासाठी याच मुंबईत सप्टेंबरमध्ये स्लॅट वॉक म्हणजेच, बेशर्मी मोर्चा निघणार आहे.
पाश्चात्य देशांतील अनेक शहरांतून फिरलेला हा बेशर्मी मोर्चा आपल्या देशाच्या राजधानीत, दिल्लीतही नुकताच निघाला होता. दिल्लीपूर्वी हा मोर्चा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही निघाला होता, परंतु त्याला इतकं महत्त्व मिळाले नव्हते. कारण जेव्हा हा मोर्चा भोपाळमध्ये निघाला होता, तेव्हा हा आपल्या मीडियासाठी अनाकलनीय शब्द होता. दिल्लीपर्यंत पोहोचता-पोहोचता स्लॅट वॉक आणि बेशर्मी मोर्चा यासारखे शब्द नीट समजू लागले होते, म्हणूनच त्याने दिल्लीच्या बेशर्मी मोर्चाला जास्त महत्त्व दिले. आता सप्टेंबर महिन्यात होणार्या बेशर्मी मोर्चाचे नेतृत्व ती मॉडेल करणार आहे, जिने विश्वचषक क्रिकेट दरम्यान असे म्हणून धक्का दिला होता की, जर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला, तर ती स्टेडियममध्येच आपल्या अंगावरील सर्व कपडे उतरवून नग्न होईल.
बेशर्मी मोर्चाच्या रुपाने त्या मॉडेलच्या हाती लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणखी एक शस्त्र लागलं आहे. काहीही असो, यात शंका नाही की, जगभरच्या महिलांची अवस्था सारखीच आहे. महिला अन्याय, अत्याचाराने पिचलेल्या आहेत. जरी आपण पाश्चात्य देशांचा अपवाद केला, तरी जगाच्या इतर भागांत महिलांची अवस्था ठीक नाही. मुस्लिम देशांत एखादा अपवाद सोडल्यास, सर्व ठिकाणी महिलांबरोबर पशुतुल्य व्यवहार केला जातो. भारताबाबत बोलायचे तर आपला देश जगातील असा चौथा देश आहे की, जेथे महिलांबरोबर सर्वाधिक दुर्व्यवहार केला जातो. महिलांना देवी समजणार्या भारतीय संस्कृतीत त्यांना विविध अन्याय, अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे, यासारखा दुसरा विरोधाभास नसावा.
अजून असं कोणतंही सर्वेक्षण झालेलं नाही, परंतु असे निश्चितपणे म्हणता येऊ शकेल की, भारतात जितके चुटकुले प्रचलित आहेत, त्यातील पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांवरच बेतलेले असतात. हीच मानसिकता विकृत बनत इथपर्यंत आली आहे की, देशाची राजधानी दिल्लीदेखील महिलांसाठी सुरक्षित नाही. एका अंदाजानुसार दिल्लीमध्ये रोज सात महिलांवर बलात्कार होतो आणि छेडछाडीच्या घटना इतक्या आम आहेत की, एक महिला जर चार तासांसाठी घर अथवा कार्यालयाबाहेर राहिली, तर तिली येता-जाताना कमीत कमी दोनशेवेळा पुरुषांच्या विकृत शेर्यांना तोंड द्यावे लागते. ही दिल्लीतीलच परिस्थिती नाही, तर संपूर्ण देशाची आहे. मुंबईही याला अपवाद नाही.
कार्यालयांत महिलांचे शोषण होते, तर घरांतही तेच होते. कन्या भ्रूणहत्या तर याची चरमसीमा आहे, यात सुशिक्षित आणि सधन कुटुंबंही सामील आहेत. एकीकडे समाजात जितके अपशब्द प्रचलित आहेत, ज्यांचा वापर पुरुष आपसातील भांडतात करतात, ते सर्व महिलांना अवमानित करणारेच असतात, तर दुसरीकडे महिलांविरुद्ध वापरले जाणारे अपशब्द आणि त्यांना केले जाणारे अश्लील इशारे मनोरंजनाचा पर्याय बनले आहेत. चित्रपटांत अधिकांश हेच असतं. तसेच पुरुष महिलांना सल्ला देतात की, त्यांनी कोणता पोशाख करावा आणि करु नये. महिलांची कोण छेड काढतं? पुरुष. त्यामुळे पुरुषांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, महिलांचा आदर करणे शिकले पाहिजे, परंतु ते करतात उलटं. ते महिलांना सांगतात की, त्यांनी काय घालावे आणि घालू नये. या सर्व बाबींतून महिलांची स्थिती किती दयनीय आहे, याची जाणीव होते, परंतु ही स्थिती बदलण्याचा उपाय बेशर्मी मोर्चासारखे कार्यक्रम असू शकत नाही. बेशर्मी मोर्चाने महिलांच्या प्रश्नाविषयीचे गांभीर्यच नष्ट होते आणि त्यात केवळ दिखाऊपणाच येतो. महिलांना बेशर्मी मोर्चा नाही, जागृती मोर्चाची आवश्यकता आहे. यासाठी महिलांनी एकजूट व्हावे आणि त्या सर्व विसंगतींविरुद्ध आवाज उठवावा, ज्यांना पुरुषांनी महिलांना दुय्यम बनवण्यासाठी निर्माण केलं आहे. कन्या भ्रूणहत्या, ऑनर किलिंग, हुंड्यासाठी छळ यासारख्या कृत्यांविरुद्ध एकजूट होऊन आवाज उठवला पाहिजे, तरच निश्चितपणे ही परिस्थिती बदलेल. स्लॅटवॉक म्हणजे, बेशर्मी मोर्चा शहरी महिलांचे फॅड आहे, याने काही साध्य होणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा