-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉
‘वडा’ हा पदार्थ काय भांडणाचा आणि भांडण लावायचा आहे? परंतु गेले काही महिने मुंबईत या वड्यावरून राजकारण रंगले आहे. या आठवड्यात तर वड्याच्या राजकारणाने उसळी घेतली, त्यामुळे या वड्याचा सांबार होते की काय वाटण्याजोगी परिस्थिती झाली. बरं हा वडा साधासुधा नाही आणि या वड्याचे पुरस्कर्तेही साधेसुधे नाहीत. एका वड्याचे नाव आहे शिववडा आणि दुसऱ्याचे नाव आहे छत्रपती वडा. मराठेशाहीत जितकी सुंदोपसुंदी झाली नसेल, तितकी या वड्यांवरून सुंदोपसुंदी चालली आहे.
दोघा पुरस्कर्त्यांकडे मराठी बाणा आहे. एकीकडे स्वाभिमान आहे तर दुसर्याकडे वाघाची डरकाळी आहे, परंतु दोघे मात्र झुंजीच्या कोंबड्यांप्रमाणे झुंजत आहेत. एवढा वडा मातब्बर कसा झाला? वडा हा पेशवेशाहीची देणगी आहे असं म्हणतात, मग आता पेशवेशाही अवतरली आहे की काय? काहीही असो आता सर्व प्रश्नांपेक्षा वडा महत्त्वाचा ठरला आहे. तो सर्वसामान्यांच्या पोटाची भूक भागवतो. त्यामुळे वडा हा पोटाचा प्रश्न बोलता येईल, परंतु तो अस्मितेचा विषय बनला आहे. अस्मितेचे अनेक प्रकार आहेत. मराठी अस्मिता आहे, भाषिक अस्मिता आहे, हिंदू अस्मिता आहे, मुस्लिम अस्मिता आहे, इतरही अस्मिता आहेत. या अस्मिता वेळोवेळी डोके वर काढत असतात आणि त्यासाठी वाद निर्माण होत असतात, परंतु दोन मराठी माणसे एकाच अस्मितेशी भांडतात, याला विशेष म्हटले पाहिजे.
वड्याचे तेल वांग्यावर काढले जाते असे म्हटले जाते, परंतु येथे मात्र उलट आहे. येथे राजकारणाचे तेल वड्यावर ओतले जात आहे. शिवछत्रपतींनाही या राजकारणाची कीव यावी असा हा प्रकार आहे. त्यांच्या नावाचा चांगल्या आदर्शासाठी (आदर्श म्हटला की छातीत धस्स होते!), शौर्यासाठी वापर व्हावा, परंतु येथे त्यांचे नाव वड्यासाठी वेठीस धरले गेले आहे. वडा तोच, पण त्यांची नावे काय शिववडा आणि छत्रपती वडा. अखंड हिंदुस्थानमध्ये भारत-पाकिस्तान अशी फाळणी व्हावी असा हा प्रकार आहे. वड्याचे साहित्य तेच, बेसन, बटाट्याची भाजी. त्यापासून निर्माण झालेला वडा मात्र शिववडा आणि छत्रपती वडा. माणूस प्रांताची फाळणी करतो आता वड्याचीही फाळणी करायला लागला आहे यासारखे दुर्दैव नाही. बरं ही फाळणी करून हा वडा पोटातच जायचा आहे. पोटात तर सर्वधर्म समभाव असतो. तिथे सर्व पदार्थांचे ऐक्य असते. मग असा हा वडा मुंबईचे ऐक्य कसा भंगवू शकतो? यात वड्याचा काही दोष नाही आणि शिवछत्रपतींचाही दोष नाही. हा दोष आहे दोन पक्षातील अहमहमिकेचा. एकाने शिववडा काढला म्हणून दुसऱ्याने छत्रपती वडा काढण्याची गरज नव्हती आणि दुसऱ्याने छत्रपती वडा काढला म्हणून पहिल्याच्या पोटात दुखायचे काही कारण नव्हते. दुर्दैवाने दोघांच्याही पोटात वड्याने दुखणे निर्माण केले आणि वातावरण काहीसे गढूळले. होय, ‘जिथे जिथे ‘शिववडा’ तिथे तिथे ‘छत्रपती वडा’ अशी घोषणा करून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेनेच्या ‘शिववडा’ योजनेला प्रत्युत्तर दिले आहे.
तथापि, शिववडा अधिकृत असून छत्रपती वडा अनधिकृत असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामधील वडा पुराण अधिकच रंगणार यात शंका नाही. वडा बिचारा म्हणत असेल, मी निनावी होतो, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. आता प्रॉब्लेमच प्रॉब्लेम निर्माण झालेत. माझे मन कोणीच विचारात घेत नाही. माझी विविध नामांतरे झाली तर माझी चव बदलणार आहे की आकार बदलणार आहे? मी तसाच ढोल्या राहणार आहे. आज मुंबईत माझी अशी अवस्था करून ठेवलेय, उर्वरित महाराष्ट्रातही माझी अशीच वेगवेगळी नामांतरे झाली, तर मी ‘घर का, ना घाटका’ राहणार. वड्याच्या या मनोगताने खवय्यांचे हृदय काही पिळवटणार नाही, पण त्यांच्या दृष्टीने वड्याला काहीही नाव दिले तरी वडा हा खाण्याचाच एक पदार्थ असणार आहे. नेत्यांमधील राजकारण कशावरून रंगत नाहीत? खुर्चीवरून नेहमीच राजकारण रंगत आले, वड्यावरून ते आता रंगले आहे. वड्यावरून सत्तेचा सोपान पार करता येईल की नाही, हे माहीत नाही. परंतु या मुद्यावरून दोन्ही पक्षीयांना स्वत:च्या प्रतिमा चमकवता येतील. यात फायदा वड्याचा नाही आणि वड्याच्या चाहत्यांचाही असणार नाही. वड्याला अखेर त्याच्या चाहत्यांच्या पोटात जायचे आहे आणि वडा हल्ली इतका स्वस्त राहिला नाही, त्यामुळे त्याच्या चाहत्यांचे खिसे रिकामे व्हायचे आहेत. फक्त वड्याला नावे देऊन राजकारण करताहेत ते नेहमी वडा खातात काय हाच शेवटी प्रश्न आहे.
‘वडा’ हा पदार्थ काय भांडणाचा आणि भांडण लावायचा आहे? परंतु गेले काही महिने मुंबईत या वड्यावरून राजकारण रंगले आहे. या आठवड्यात तर वड्याच्या राजकारणाने उसळी घेतली, त्यामुळे या वड्याचा सांबार होते की काय वाटण्याजोगी परिस्थिती झाली. बरं हा वडा साधासुधा नाही आणि या वड्याचे पुरस्कर्तेही साधेसुधे नाहीत. एका वड्याचे नाव आहे शिववडा आणि दुसऱ्याचे नाव आहे छत्रपती वडा. मराठेशाहीत जितकी सुंदोपसुंदी झाली नसेल, तितकी या वड्यांवरून सुंदोपसुंदी चालली आहे.
दोघा पुरस्कर्त्यांकडे मराठी बाणा आहे. एकीकडे स्वाभिमान आहे तर दुसर्याकडे वाघाची डरकाळी आहे, परंतु दोघे मात्र झुंजीच्या कोंबड्यांप्रमाणे झुंजत आहेत. एवढा वडा मातब्बर कसा झाला? वडा हा पेशवेशाहीची देणगी आहे असं म्हणतात, मग आता पेशवेशाही अवतरली आहे की काय? काहीही असो आता सर्व प्रश्नांपेक्षा वडा महत्त्वाचा ठरला आहे. तो सर्वसामान्यांच्या पोटाची भूक भागवतो. त्यामुळे वडा हा पोटाचा प्रश्न बोलता येईल, परंतु तो अस्मितेचा विषय बनला आहे. अस्मितेचे अनेक प्रकार आहेत. मराठी अस्मिता आहे, भाषिक अस्मिता आहे, हिंदू अस्मिता आहे, मुस्लिम अस्मिता आहे, इतरही अस्मिता आहेत. या अस्मिता वेळोवेळी डोके वर काढत असतात आणि त्यासाठी वाद निर्माण होत असतात, परंतु दोन मराठी माणसे एकाच अस्मितेशी भांडतात, याला विशेष म्हटले पाहिजे.
वड्याचे तेल वांग्यावर काढले जाते असे म्हटले जाते, परंतु येथे मात्र उलट आहे. येथे राजकारणाचे तेल वड्यावर ओतले जात आहे. शिवछत्रपतींनाही या राजकारणाची कीव यावी असा हा प्रकार आहे. त्यांच्या नावाचा चांगल्या आदर्शासाठी (आदर्श म्हटला की छातीत धस्स होते!), शौर्यासाठी वापर व्हावा, परंतु येथे त्यांचे नाव वड्यासाठी वेठीस धरले गेले आहे. वडा तोच, पण त्यांची नावे काय शिववडा आणि छत्रपती वडा. अखंड हिंदुस्थानमध्ये भारत-पाकिस्तान अशी फाळणी व्हावी असा हा प्रकार आहे. वड्याचे साहित्य तेच, बेसन, बटाट्याची भाजी. त्यापासून निर्माण झालेला वडा मात्र शिववडा आणि छत्रपती वडा. माणूस प्रांताची फाळणी करतो आता वड्याचीही फाळणी करायला लागला आहे यासारखे दुर्दैव नाही. बरं ही फाळणी करून हा वडा पोटातच जायचा आहे. पोटात तर सर्वधर्म समभाव असतो. तिथे सर्व पदार्थांचे ऐक्य असते. मग असा हा वडा मुंबईचे ऐक्य कसा भंगवू शकतो? यात वड्याचा काही दोष नाही आणि शिवछत्रपतींचाही दोष नाही. हा दोष आहे दोन पक्षातील अहमहमिकेचा. एकाने शिववडा काढला म्हणून दुसऱ्याने छत्रपती वडा काढण्याची गरज नव्हती आणि दुसऱ्याने छत्रपती वडा काढला म्हणून पहिल्याच्या पोटात दुखायचे काही कारण नव्हते. दुर्दैवाने दोघांच्याही पोटात वड्याने दुखणे निर्माण केले आणि वातावरण काहीसे गढूळले. होय, ‘जिथे जिथे ‘शिववडा’ तिथे तिथे ‘छत्रपती वडा’ अशी घोषणा करून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेनेच्या ‘शिववडा’ योजनेला प्रत्युत्तर दिले आहे.
तथापि, शिववडा अधिकृत असून छत्रपती वडा अनधिकृत असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामधील वडा पुराण अधिकच रंगणार यात शंका नाही. वडा बिचारा म्हणत असेल, मी निनावी होतो, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. आता प्रॉब्लेमच प्रॉब्लेम निर्माण झालेत. माझे मन कोणीच विचारात घेत नाही. माझी विविध नामांतरे झाली तर माझी चव बदलणार आहे की आकार बदलणार आहे? मी तसाच ढोल्या राहणार आहे. आज मुंबईत माझी अशी अवस्था करून ठेवलेय, उर्वरित महाराष्ट्रातही माझी अशीच वेगवेगळी नामांतरे झाली, तर मी ‘घर का, ना घाटका’ राहणार. वड्याच्या या मनोगताने खवय्यांचे हृदय काही पिळवटणार नाही, पण त्यांच्या दृष्टीने वड्याला काहीही नाव दिले तरी वडा हा खाण्याचाच एक पदार्थ असणार आहे. नेत्यांमधील राजकारण कशावरून रंगत नाहीत? खुर्चीवरून नेहमीच राजकारण रंगत आले, वड्यावरून ते आता रंगले आहे. वड्यावरून सत्तेचा सोपान पार करता येईल की नाही, हे माहीत नाही. परंतु या मुद्यावरून दोन्ही पक्षीयांना स्वत:च्या प्रतिमा चमकवता येतील. यात फायदा वड्याचा नाही आणि वड्याच्या चाहत्यांचाही असणार नाही. वड्याला अखेर त्याच्या चाहत्यांच्या पोटात जायचे आहे आणि वडा हल्ली इतका स्वस्त राहिला नाही, त्यामुळे त्याच्या चाहत्यांचे खिसे रिकामे व्हायचे आहेत. फक्त वड्याला नावे देऊन राजकारण करताहेत ते नेहमी वडा खातात काय हाच शेवटी प्रश्न आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा