-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
कलाप्रांतातील मी यात्रिक आहे. पेशाने मी हॉटेल व्यावसायिक आहे, परंतु मनाने कलाकार आहे. कलासक्त प्रवृत्तीमुळे जे सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे, त्या त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रेम करतो. माझं चित्रकलेवर जसं प्रेम आहे, तसंच नाट्यकलेवरही प्रेम आहे. या कलांवर मी केवळ प्रेमच करीत नाही, तर माझे समग्र जीवनच कलामय बनले आहे. विविध वाद्यवादनात मी पारंगत आहे. गिटार वादनात मी विशेष निपुण आहे, ती मी रसिकांना रिझवण्यासाठी वाजवतो, तर स्वत:ला रिझवण्यासाठी आणि इतरांना आनंद देण्यासाठी चित्ररेखाटन करतो. कॅन्व्हासवर चित्रांचे रंगलेपन करता करता माझ्या चेहर्यावर रंगलेपन कधी झाले आणि मी नाट्य-चित्रपट कलाकार कधी बनलो ते कळलेच नाही, असे अलिबागेतील ‘रुची तरंग’ हॉटेलचे युवा मालक व अभिनेते राहुल बोडस सांगतात तेव्हा आपल्यासमोर चैतन्याचा सागर उभा असल्याचे जाणवते.
अभिनेते राहुल बोडस याचं प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवली येथे तर माध्यमिक शिक्षण अलिबाग येथे झाले. वडील दत्तात्रेय बोडस यांचा डोंबिवली येथे कॅटरींगचा व्यवसाय आहे. आई सौ. मेधा दत्तात्रेय बोडस या अलिबागच्या नारायण बाम यांच्या कन्या. त्यामुळे अलिबाग हे राहुल बोडस यांचे आजोळ. आजोबांना संगीताची विशेष आवड. तबला, हार्मोनियम इत्यादी वाद्यवादनात त्यांचा हातखंडा होता. या सर्वाचे कळत-नळकत संस्कार राहुल बोडस यांच्यावर झाले. त्यामुळेच ते कलाप्रांतात ओढले गेले. नृत्यनाटिका, नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, मॉडेलिंग, अल्बम या सर्व क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा ‘तिचं चुकलं तरी काय?’ हा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला त्यानिमित्त मांडलेली ही गप्पांची मैफल.
राहुलजी, तुम्ही स्वत:विषयी काही सांगा?
- नाटक, चित्रपट हा माझा ध्यास असला तरी हॉटेल व्यवसाय हा माझा श्वास आहे. कलाक्षेत्रात मी वावरत असलो तरी माझ्या व्यवसायाशी मी प्रामाणिक राहणार आहे. अभिनय क्षेत्रात वावरत असतानाही मी माझ्या व्यवसायाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. मी कॅटरिंग डिप्लोमा केला आहे. ताज हॉटेलमध्ये 3 महिने मी सर्व्हिसही केली आहे. भ्रंमतीच्या आवडीमुळे ट्रॅव्हल इन टुरिझम मॅनेजमेंट डीग्रीही मी मिळवली आहे. अनुभव ट्रॅव्हल एजन्सीमध्ये 2 महिने मी हिमाचल प्रदेशात ट्रेनिंगलाही गेलो होतो. त्यानंतर मी स्वत:च्या हॉटेल व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. मी मिळवलेल्या अनुभवाचा फायदा निश्चितच माझ्या हॉटेल व्यवसायाला होतो. आई-वडिलांनी अलिबागेत लावलेल्या हॉटेल रुची तरुंगच्या रोपट्याचा कल्पवृक्ष करायचा आहे. हे सर्व करताना मी अभिनयाचा छंदही जोपासत आहे आणि मी निश्चितच या क्षेत्रातील यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीन.
राहुलजी, अभिनय क्षेत्रात तुम्ही कसे ओढले गेलात?
- खरंच सारे नकळत घडले. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 1998 साली पर्सनालिटी शोजमध्ये सहभागी होऊन ‘डोंबिवली चर्मिंग प्रिंस’ हा किताब मिळवला. त्यानंतर मासिकांसाठी मॉडेलिंग करण्याच्या मला संधी मिळाल्या. मी विविध जाहिरातींत झळकू लागलो. मॉडेलिंग करीत असतानाच कुसुमाग्रज यांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या काव्यरचनेवर आधारीत ‘वसुंधरा’ या नृत्यनाटिकेत डॉ. मीना नेरुरकर यांनी मला अभिनयाची संधी दिली. त्यानंतर मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’ नाट्यसंस्थेत विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या नाटकात गारद्याची भूमिका करण्याची संधी मिळाली. या नाटकाचे 60 ते 70 प्रयोग झाले. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लावणीप्रधान कार्यक्रमात डॉ. मीना नेरुरकर यांनी पुन्हा मला आमंत्रित केले. यापूर्वी त्यांच्या ‘वसुंधरा’ नृत्यनाटिकेत मी काम केले असल्यामुळे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कार्यक्रमात मी गायकाची भूमिका कोणत्याही दडपणाविना रंगवली. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ग्रुपमध्ये कोणतेही काम करण्यास मी कधी संकोच केला नाही. कोणी कलाकार कमी असेल, तर त्यांची आम्ही कधी उणीव भासू दिली नाही. ‘कमी तेथे आम्ही’ ही माझी सकारात्मक भूमिका असल्यामुळे तेथे मला खूप काही शिकायला मिळाले आणि त्याचा मला पुढे खूपच फायदा झाला.
राहुलजी, तुम्ही नंतर चित्रपटांकडे कसे वळलात?
- मी अलिबागेत माझ्या ‘रुची तरंग’ हॉटेलवर लक्ष केंद्रीत केले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, हॉटेल व्यवसाय करताना मी कलाप्रांताचाही आनंद लुटू शकतो. रायगड जिल्ह्यात जशी पर्यटनस्थळे आहेत, तशीच चित्रपटांसाठी चित्रीकरण करण्यायोग्य नयनरम्य स्थळेही आहेत. या स्थळावर चित्रपट निमार्त्यांना खेचून आणण्याच्या दृष्टीने मी कामाला लागलो. माझ्या प्रयत्नांत मी यशस्वी झालो. संजय सूरकर माझ्या संपर्कात आले. त्यांच्या आई शपथ, चाहूल, आव्हान, तांदळा इत्यादी चित्रपटांची लोकेशनची कामे मी केली आणि त्यांच्या ‘आई शपथ’ या चित्रपटात मी ‘श्रीरंग’ या गायकाची भूमिकाही केली. या भूमिकेला रसिकांनी डोक्यावर घेतले.
सुमीतच्या ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटात गाढव बनलेल्या गंधर्वाची मी भूमिका केली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, सोनाली कुलकर्णी, संजय खापरे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचीही रसिकांनी वाहव्वा केली.
प्रशांत भेलांडे निर्मित, अशोक कार्लेकर दिग्दर्शित ‘सौभाग्यवती भव’ या चित्रपटात मी प्रमुख भूमिका केली. या चित्रपटात शरद पोंक्षे आणि आशा साठे यांच्या मुलाचे पात्र मी रंगवले आहे. हा चित्रपट धुमधडाक्यात सुरु आहे.
‘तिचं चुकलं तरी काय?’ या चित्रपटात मी नायकाची भूमिका रंगवली आहे. या चित्रपटात डॉ. गिरीश ओक, मोहन जोशी, वंदना गुप्ते, दीपज्योती नायक इत्यादी दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटात ‘एड्स’बाबत सामाजिक वास्तव दाखवले आहे. या चित्रपटाची कथा मी येथे सांगत नाही. रसिकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघावा अशी मी नम्र विनंती करतो.
राहुलजी, तुमच्या या चित्रपटाला आमच्या शुभेच्छा! आता तुम्ही तुमच्या आगामी चित्रपटांविषयी सांगा?
- सिद्धविजय संस्था निर्मित, एन. रेळेकर दिग्दर्शित ‘नवनाथ महात्म्य’ या आगामी चित्रपटात मी गोरक्षनाथांची भूमिका केली आहे, ती निश्चितच सर्वांना आवडेल.
राहुलजी, तुम्ही कोणत्या टीव्ही मालिकेत भूमिका केली आहे?
- संजय सूरकर यांच्या ‘अभिलाषा’ या झी मराठीवरील मालिकेत मी ‘अनिकेत मुजुमदार’ ही भूमिका केली. वंदना गुप्ते, आदिती सारंगधर, उदय टिकेकर इत्यादी कलाकार या मालिकेत होते. स्मिता तळवळकर यांच्या ‘अस्मिता चित्र’ची ही मालिका खूपच लोकप्रिय होती.
राहुलजी, लोकेशन गाईड आणि तुमची अभिनय कारकीर्द कशी समांतर सुरु राहिली त्याबाबत सांगा?
- मी चित्रपट, मालिका निर्मात्या-दिग्दर्शकांना जिल्ह्यात नवनवी लोकेशन्स मिळवून देऊ लागलो. त्यासाठी प्रशासनाच्या परवानग्या, साहित्याची ने-आण ही किचकट कामेही मी केली आहेत, त्यामुळे आता मी यात वाक्बगार झालो आहे. योगेश भारद्वाज यांच्या ‘अपराध एक सरगना’ चित्रपटासाठी रेवस ते कार्लेखिंड या मी दाखविलेल्या लोकेशनवर चित्रीकरण झाले. गंमतीचा भाग म्हणजे रेवस ते कार्लेखिंड हा भाग उत्तर प्रदेशातील एक विभाग म्हणून चित्रित करण्यात आला होता.
मंदार देवस्थळी यांच्या चित्रपटाचे शुटिंग मांडवा येथे झाले, त्या चित्रपटात मी ‘न्यूजरिडर’ म्हणून भूमिका केली आहे. ‘दिवानगीने हद करली’ या जितेंद्र पुरोहित निर्मित, दिग्दर्शित हिंदी चित्रपटासाठी कासा किल्ल्याचं रिस्की चित्रीकरण करण्यास मी मदत केली. हे लोकेशन त्या चित्रपटात वापरायला लावून मी चित्रपटात रंगत आणली.
‘स्टार प्रवाह‘वरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेसाठी मी रेवदंडा येथील लोकेशन मिळवून दिले. तसेच श्रीरंग गोडबोले यांच्या कॉसमॉस बँकेच्या जाहिरातीसाठी कोर्लईच्या समुद्र किनार्यांचे लोकेशन मीच मिळवून दिले. तर कृणाल म्युझिकच्या ‘गंध गारवा’ या अल्बमसाठी अलिबागेतील सिद्धेश्वर भागाचे लोकेशन उपलब्ध करुन दिले आणि त्यात भूमिकाही केली. या अल्बममध्ये अविनाश नारकर, सुबोध भावे, अमोल कोल्हे आणि मी धम्माल केली आहे. त्यानंतर कृणाल म्युझिकचे तीन चार अल्बम मी केले. एक अलिबाग कोळीवाड्यात केला. त्याच्यातही काम केले.
राहुलजी, तुमचे ध्येय काय आहे?
- नाट्य-चित्रपट अभिनय हा माझा छंद आहे, त्यात मला एक वेगळी उंची गाठायची आहे, यासाठी मला माझे आई-वडील यांचे आशीर्वाद आणि पत्नी सौ. ऋचा बोडस, मुले अथर्व, सई यांचा पाठिंबा आहेच. परंतु आई-वडिलांनी माझ्या हाती जो ‘रुची तरंग’ हॉटेलचा व्यवसाय विश्वासाने दिला आहे, तो मला वाढवायचा आहे. आज माझ्या हॉटेलमध्ये मोठमोठे कलाकार उतरल्याविना पुढे जात नाहीत. त्यामुळे कलाकारांचे हॉटेल हे गुडविल मला अबाधित ठेवायचे आहे.
खरेच, ‘रुची तरंग’ हे हॉटेल कलाकारांचे हॉटेल आहे, कारण त्याचा मालकच कलासक्त आणि कलाकार आहे. राहुल बोडस यांनी मराठी, हिंदी चित्रपट, मालिका यांच्यासाठी रायगड जिल्ह्यातील नयनरम्य लोकेशन्स देऊन रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडावे, रायगडच्या जनतेला निश्चितच याचा आनंद होईल.
कलाप्रांतातील मी यात्रिक आहे. पेशाने मी हॉटेल व्यावसायिक आहे, परंतु मनाने कलाकार आहे. कलासक्त प्रवृत्तीमुळे जे सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे, त्या त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रेम करतो. माझं चित्रकलेवर जसं प्रेम आहे, तसंच नाट्यकलेवरही प्रेम आहे. या कलांवर मी केवळ प्रेमच करीत नाही, तर माझे समग्र जीवनच कलामय बनले आहे. विविध वाद्यवादनात मी पारंगत आहे. गिटार वादनात मी विशेष निपुण आहे, ती मी रसिकांना रिझवण्यासाठी वाजवतो, तर स्वत:ला रिझवण्यासाठी आणि इतरांना आनंद देण्यासाठी चित्ररेखाटन करतो. कॅन्व्हासवर चित्रांचे रंगलेपन करता करता माझ्या चेहर्यावर रंगलेपन कधी झाले आणि मी नाट्य-चित्रपट कलाकार कधी बनलो ते कळलेच नाही, असे अलिबागेतील ‘रुची तरंग’ हॉटेलचे युवा मालक व अभिनेते राहुल बोडस सांगतात तेव्हा आपल्यासमोर चैतन्याचा सागर उभा असल्याचे जाणवते.
अभिनेते राहुल बोडस याचं प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवली येथे तर माध्यमिक शिक्षण अलिबाग येथे झाले. वडील दत्तात्रेय बोडस यांचा डोंबिवली येथे कॅटरींगचा व्यवसाय आहे. आई सौ. मेधा दत्तात्रेय बोडस या अलिबागच्या नारायण बाम यांच्या कन्या. त्यामुळे अलिबाग हे राहुल बोडस यांचे आजोळ. आजोबांना संगीताची विशेष आवड. तबला, हार्मोनियम इत्यादी वाद्यवादनात त्यांचा हातखंडा होता. या सर्वाचे कळत-नळकत संस्कार राहुल बोडस यांच्यावर झाले. त्यामुळेच ते कलाप्रांतात ओढले गेले. नृत्यनाटिका, नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, मॉडेलिंग, अल्बम या सर्व क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा ‘तिचं चुकलं तरी काय?’ हा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला त्यानिमित्त मांडलेली ही गप्पांची मैफल.
राहुलजी, तुम्ही स्वत:विषयी काही सांगा?
- नाटक, चित्रपट हा माझा ध्यास असला तरी हॉटेल व्यवसाय हा माझा श्वास आहे. कलाक्षेत्रात मी वावरत असलो तरी माझ्या व्यवसायाशी मी प्रामाणिक राहणार आहे. अभिनय क्षेत्रात वावरत असतानाही मी माझ्या व्यवसायाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. मी कॅटरिंग डिप्लोमा केला आहे. ताज हॉटेलमध्ये 3 महिने मी सर्व्हिसही केली आहे. भ्रंमतीच्या आवडीमुळे ट्रॅव्हल इन टुरिझम मॅनेजमेंट डीग्रीही मी मिळवली आहे. अनुभव ट्रॅव्हल एजन्सीमध्ये 2 महिने मी हिमाचल प्रदेशात ट्रेनिंगलाही गेलो होतो. त्यानंतर मी स्वत:च्या हॉटेल व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. मी मिळवलेल्या अनुभवाचा फायदा निश्चितच माझ्या हॉटेल व्यवसायाला होतो. आई-वडिलांनी अलिबागेत लावलेल्या हॉटेल रुची तरुंगच्या रोपट्याचा कल्पवृक्ष करायचा आहे. हे सर्व करताना मी अभिनयाचा छंदही जोपासत आहे आणि मी निश्चितच या क्षेत्रातील यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीन.
राहुलजी, अभिनय क्षेत्रात तुम्ही कसे ओढले गेलात?
- खरंच सारे नकळत घडले. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 1998 साली पर्सनालिटी शोजमध्ये सहभागी होऊन ‘डोंबिवली चर्मिंग प्रिंस’ हा किताब मिळवला. त्यानंतर मासिकांसाठी मॉडेलिंग करण्याच्या मला संधी मिळाल्या. मी विविध जाहिरातींत झळकू लागलो. मॉडेलिंग करीत असतानाच कुसुमाग्रज यांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या काव्यरचनेवर आधारीत ‘वसुंधरा’ या नृत्यनाटिकेत डॉ. मीना नेरुरकर यांनी मला अभिनयाची संधी दिली. त्यानंतर मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’ नाट्यसंस्थेत विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या नाटकात गारद्याची भूमिका करण्याची संधी मिळाली. या नाटकाचे 60 ते 70 प्रयोग झाले. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लावणीप्रधान कार्यक्रमात डॉ. मीना नेरुरकर यांनी पुन्हा मला आमंत्रित केले. यापूर्वी त्यांच्या ‘वसुंधरा’ नृत्यनाटिकेत मी काम केले असल्यामुळे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कार्यक्रमात मी गायकाची भूमिका कोणत्याही दडपणाविना रंगवली. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ग्रुपमध्ये कोणतेही काम करण्यास मी कधी संकोच केला नाही. कोणी कलाकार कमी असेल, तर त्यांची आम्ही कधी उणीव भासू दिली नाही. ‘कमी तेथे आम्ही’ ही माझी सकारात्मक भूमिका असल्यामुळे तेथे मला खूप काही शिकायला मिळाले आणि त्याचा मला पुढे खूपच फायदा झाला.
राहुलजी, तुम्ही नंतर चित्रपटांकडे कसे वळलात?
- मी अलिबागेत माझ्या ‘रुची तरंग’ हॉटेलवर लक्ष केंद्रीत केले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, हॉटेल व्यवसाय करताना मी कलाप्रांताचाही आनंद लुटू शकतो. रायगड जिल्ह्यात जशी पर्यटनस्थळे आहेत, तशीच चित्रपटांसाठी चित्रीकरण करण्यायोग्य नयनरम्य स्थळेही आहेत. या स्थळावर चित्रपट निमार्त्यांना खेचून आणण्याच्या दृष्टीने मी कामाला लागलो. माझ्या प्रयत्नांत मी यशस्वी झालो. संजय सूरकर माझ्या संपर्कात आले. त्यांच्या आई शपथ, चाहूल, आव्हान, तांदळा इत्यादी चित्रपटांची लोकेशनची कामे मी केली आणि त्यांच्या ‘आई शपथ’ या चित्रपटात मी ‘श्रीरंग’ या गायकाची भूमिकाही केली. या भूमिकेला रसिकांनी डोक्यावर घेतले.
सुमीतच्या ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटात गाढव बनलेल्या गंधर्वाची मी भूमिका केली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, सोनाली कुलकर्णी, संजय खापरे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचीही रसिकांनी वाहव्वा केली.
प्रशांत भेलांडे निर्मित, अशोक कार्लेकर दिग्दर्शित ‘सौभाग्यवती भव’ या चित्रपटात मी प्रमुख भूमिका केली. या चित्रपटात शरद पोंक्षे आणि आशा साठे यांच्या मुलाचे पात्र मी रंगवले आहे. हा चित्रपट धुमधडाक्यात सुरु आहे.
‘तिचं चुकलं तरी काय?’ या चित्रपटात मी नायकाची भूमिका रंगवली आहे. या चित्रपटात डॉ. गिरीश ओक, मोहन जोशी, वंदना गुप्ते, दीपज्योती नायक इत्यादी दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटात ‘एड्स’बाबत सामाजिक वास्तव दाखवले आहे. या चित्रपटाची कथा मी येथे सांगत नाही. रसिकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघावा अशी मी नम्र विनंती करतो.
राहुलजी, तुमच्या या चित्रपटाला आमच्या शुभेच्छा! आता तुम्ही तुमच्या आगामी चित्रपटांविषयी सांगा?
- सिद्धविजय संस्था निर्मित, एन. रेळेकर दिग्दर्शित ‘नवनाथ महात्म्य’ या आगामी चित्रपटात मी गोरक्षनाथांची भूमिका केली आहे, ती निश्चितच सर्वांना आवडेल.
राहुलजी, तुम्ही कोणत्या टीव्ही मालिकेत भूमिका केली आहे?
- संजय सूरकर यांच्या ‘अभिलाषा’ या झी मराठीवरील मालिकेत मी ‘अनिकेत मुजुमदार’ ही भूमिका केली. वंदना गुप्ते, आदिती सारंगधर, उदय टिकेकर इत्यादी कलाकार या मालिकेत होते. स्मिता तळवळकर यांच्या ‘अस्मिता चित्र’ची ही मालिका खूपच लोकप्रिय होती.
राहुलजी, लोकेशन गाईड आणि तुमची अभिनय कारकीर्द कशी समांतर सुरु राहिली त्याबाबत सांगा?
- मी चित्रपट, मालिका निर्मात्या-दिग्दर्शकांना जिल्ह्यात नवनवी लोकेशन्स मिळवून देऊ लागलो. त्यासाठी प्रशासनाच्या परवानग्या, साहित्याची ने-आण ही किचकट कामेही मी केली आहेत, त्यामुळे आता मी यात वाक्बगार झालो आहे. योगेश भारद्वाज यांच्या ‘अपराध एक सरगना’ चित्रपटासाठी रेवस ते कार्लेखिंड या मी दाखविलेल्या लोकेशनवर चित्रीकरण झाले. गंमतीचा भाग म्हणजे रेवस ते कार्लेखिंड हा भाग उत्तर प्रदेशातील एक विभाग म्हणून चित्रित करण्यात आला होता.
मंदार देवस्थळी यांच्या चित्रपटाचे शुटिंग मांडवा येथे झाले, त्या चित्रपटात मी ‘न्यूजरिडर’ म्हणून भूमिका केली आहे. ‘दिवानगीने हद करली’ या जितेंद्र पुरोहित निर्मित, दिग्दर्शित हिंदी चित्रपटासाठी कासा किल्ल्याचं रिस्की चित्रीकरण करण्यास मी मदत केली. हे लोकेशन त्या चित्रपटात वापरायला लावून मी चित्रपटात रंगत आणली.
‘स्टार प्रवाह‘वरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेसाठी मी रेवदंडा येथील लोकेशन मिळवून दिले. तसेच श्रीरंग गोडबोले यांच्या कॉसमॉस बँकेच्या जाहिरातीसाठी कोर्लईच्या समुद्र किनार्यांचे लोकेशन मीच मिळवून दिले. तर कृणाल म्युझिकच्या ‘गंध गारवा’ या अल्बमसाठी अलिबागेतील सिद्धेश्वर भागाचे लोकेशन उपलब्ध करुन दिले आणि त्यात भूमिकाही केली. या अल्बममध्ये अविनाश नारकर, सुबोध भावे, अमोल कोल्हे आणि मी धम्माल केली आहे. त्यानंतर कृणाल म्युझिकचे तीन चार अल्बम मी केले. एक अलिबाग कोळीवाड्यात केला. त्याच्यातही काम केले.
राहुलजी, तुमचे ध्येय काय आहे?
- नाट्य-चित्रपट अभिनय हा माझा छंद आहे, त्यात मला एक वेगळी उंची गाठायची आहे, यासाठी मला माझे आई-वडील यांचे आशीर्वाद आणि पत्नी सौ. ऋचा बोडस, मुले अथर्व, सई यांचा पाठिंबा आहेच. परंतु आई-वडिलांनी माझ्या हाती जो ‘रुची तरंग’ हॉटेलचा व्यवसाय विश्वासाने दिला आहे, तो मला वाढवायचा आहे. आज माझ्या हॉटेलमध्ये मोठमोठे कलाकार उतरल्याविना पुढे जात नाहीत. त्यामुळे कलाकारांचे हॉटेल हे गुडविल मला अबाधित ठेवायचे आहे.
खरेच, ‘रुची तरंग’ हे हॉटेल कलाकारांचे हॉटेल आहे, कारण त्याचा मालकच कलासक्त आणि कलाकार आहे. राहुल बोडस यांनी मराठी, हिंदी चित्रपट, मालिका यांच्यासाठी रायगड जिल्ह्यातील नयनरम्य लोकेशन्स देऊन रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडावे, रायगडच्या जनतेला निश्चितच याचा आनंद होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा