-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
एक पायरी नाटकाची, एक पायरी चित्रपटाची. या पायर्यांवर मी कधी अडखळले नाही, पडले नाही. हा माझा प्रवास आवडीचा होता, त्यामुळे मी परिश्रम घेतले तरी माझी दमछाक झाली नाही. रंगभूमीवरील तिसर्या घंटेने माझ्या श्वासाला आत्मविश्वास दिला. माझ्या चित्रपटांना पडलेल्या टाळ्यांनी माझ्या अभिनयाला कौतुकाचा साज चढवला. आज जरी माझी ओळख नाट्य-चित्रपट विश्वात एक अभिनेत्री म्हणून असली तरी मी मात्र एक सच्ची कलायात्री आहे. माझा कलाप्रवास रसिकांच्या प्रेमामुळे सतत उंचावतच राहिला आहे, असे नाट्य-चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर म्हणतात, तेव्हा त्यांच्यातील कलाकाराचा आवाका अमर्यादित असल्याचे जाणवते.
वीणा जामकर. उरण येथील मनोहर जामकर यांच्या कलासक्त कन्या. चार दिवस प्रेमाचे, एक रिकामी बाजू दलपतसिंग येता गावा अशा व्यावसायिक नाटकांत आणि वळू, गाभ्रीचा पाऊस, विहीर, जन्म, लालबाग परळ अशा चित्रपटात आपल्या अप्रतिम अभिनयाने वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीने जो स्वत:चा ठसा उमटविला आहे, तो कधीही पुसला जाणारा नाही. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे वीणा जामकर यांनी एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजले आहेत. ‘पलतडचो मुनिस’ हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरांटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं. अशा या गुणी अभिनेत्रीबरोबरील ही गप्पांची मैफल.
वीणाजी, कलाक्षेत्रात तुम्ही कधी पाऊल टाकले?
- माझे संपूर्ण कुटुंबच कलासक्त आहे. माझी आई अलका जामकर शिक्षिका आहे आणि ती उत्तम गाते. ती नाटकात कामही करायची. माझे वडील चित्रकार आहेत. ते उत्कृष्ट तबला वाजवतात. अशा वातावरणात मी वाढले आहे. अडीच वर्षांची असताना मी पहिलं नाटक केलं. मग पाच वर्षाची असताना एकपात्री अभिनयही केला. आईच्या कडेवर बसून. त्या वयात आपले पालक आपल्याला सांगतात की, असं असं कर आणि आपण तसं करतो. तसं मी केलं आणि माझ्याही नकळत मला ते जमलं. लोकांना माझं काम आवडलं. आई-बाबांना आवडलं. त्यानंतर मग आई-बाबांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं. बाबा मला बालनाट्य शिबिरात घेऊन जायचे. मला नृत्याची आवड होती, म्हणूनच मला कथ्थक शिकायला पाठवलं. अभ्यास सांभाळून नाटक, नृत्य करायला मला आई-बाबांनी कायम प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत असताना ‘वैरी’ नावाची एकांकिका केली. त्या नाटकासाठी मला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बालकलाकाराचंही पारितोषिक मिळालं होतं. यानंतर पुढच्या काळात काही संस्थांच्या एकांकिका, उरणच्या संस्थांसाठी एकांकिका केल्या.
वीणाजी, नाटकात कारकीर्द करावी असं केव्हा ठरवलत?
- दहावी झाल्यानंतर मी ठरवलं की, याच क्षेत्रात काहीतरी करायचं, कारण नाटकात काम करणं मला मनापासून आवडत होतं. मला तेव्हा केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळण्याची सातवीपासून ते पदवीधर होईपर्यंत मला ती मिळणार होती. मात्र त्यासाठी दर दोन वर्षांनी मुलाखत द्यावी लागे. दहावीनंतर कमलाकर सोनटक्के यांनी माझी मुलाखत घेतली होती. ‘मला अभिनयाची आवड आहे, नाटकात काम करायचं आहे, मी काय करु? असं मी त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी मला मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मग मी रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला.
वीणाजी, रुपारेल कॉलेजचे व्यासपीठ तुमच्या कलेला कसे पोषक ठरले?
- रुपारेल कॉलेज एकूणच सांस्कृतिक घडामोंडीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असताना मग मी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. मी आणि अद्वैत दादरकरने एका युवा महोत्सवात शफाअत खानाची ‘क’ नावाची एकांकिका केली होती. तेव्ही मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. या स्पर्धेसाठी चेतन दातार परीक्षक होता. मला आणि अद्वैतला अभिनयासाठी सुवर्णपदकं मिळाली होती. चेतन दातारनं आमच्या या एकांकिकेचा प्रयोग ‘आविष्कार’ला ठेवला. मुंबईत येऊन तेव्हा मला दोन वर्षे झाली होती आणि ‘आविष्कार’मध्ये कसा प्रवेश मिळवायचा, याच धडपडीत मी होते आणि योगायोगाने १० जुलै २००३ रोजी, माझ्या वाढदिवशीच सुलभाताई देशपांडे यांच्यासमोर ‘आविष्कार’च्या रंगमंचावर एकांकिका सादर करण्याचे भाग्य मला लाभले.
वीणाजी, तुमचा आविष्कारच्या निमित्ताने जो प्रायोगिक नाटकांचा प्रवास झाला, तो कसा झाला?
- ‘क’ या एकांकिकेनंतर चेतन दातार याने ‘जंगल में मंगल’ हे नाटक केलं. ते माझं पहिलं प्रायोगिक नाटक. तेव्हा त्यातली एक प्रमुख भूमिका मला दिली होती. शेक्सपीअरच्या ‘अ मिडसमर नाईटस् ड्रीम’वर हे नाटक आधारित होतं. या नाटकाची मजा म्हणजे सर्व मुलांनी स्त्री भूमिका केल्या होत्या आणि सर्व मुलींनी पुरुषांची काम केली होती. माझ्या व्यक्तीरेखेचं नाव ‘पक्या’ होतं, म्हणजे मूळ नाटकातला ‘पक’ खूप एनर्जी असलेलं हे नाटक होतं. त्यानंतर ‘खेळ मांडियेला’ नावाचं नाटक केलं. चेतनने एका क्रोएशियन नाटकाचं हे भाषांतर केलं होतं. पं. सत्यदेव दुबे आणि सोनाली कुलकर्णी यांनी हे नाटक इंग्रजीत केलं होतं. मी आणि मंगेश भिडेने ते मराठीत केलं. एक व्यावसायिक नाटकातली मोठी अभिनेत्री आणि प्रायोगिक नाटकाचा दिग्दर्शक या दोन पात्राचं हे नाटक होतं. ही भूमिका तशी कठीण होती. तेव्हा मी फक्त एकोणीस वर्षांची होते. चेतनने भाषांतर व दिग्दर्शन करताना अनेक खरे संदर्भ वापरले होते. अनेक खर्या अभिनेत्रींच्या लकबी मला दिल्या होत्या. त्यावेळी जशी पेलली तशी मी ती भूमिका केली, पण माझं त्या भूमिकेमुळे खूप कौतुक झालं. त्या भूमिकेसाठी मला त्या वर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार’ आणि ‘मामा वरेरकर पुरस्कार’ असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.
वीणाजी, व्यावसायिक नाटकातही तुम्ही दमदार पदार्पण केलेत त्याबाबत सांगा?
- २००४ साली मी ‘एवढंच ना’ हे पहिले व्यावसायिक नाटक केले. यात माझी प्रमुख भूमिका होती. त्यानंतरचे दुसरे व्यावसायिक नाटक ‘चार दिवस प्रेमाचे’ सुयोगसारखी संस्था आणि प्रशांत दामले, सविता प्रभुणे, अरुण नलावडे हे सहकलाकार. खूप मजा यायची हे नाटक करताना या नाटकाचा शंभर प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘हिच ती दिवाळी’ या इरावती कर्णिक लिखित व अद्वैत दादरकर लिखित नाटकाच्या ३५ प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘एक रिकामी बाजू’ या नाटकातील भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. या नाटकात माझ्याबरोबर गीतांजली कुलकर्णी होती. स्तनाचा कर्करोग झालेल्या एका तरुणीची ही कथा होती. या नाटकात मी वेगवेगळ्या आठ भूमिका केल्या आहेत. थिट्रीक संस्थेच्या या नाटकास २००९ साली झी गौरवचा प्रायोगिक विभागाचा पुरस्कार मिळाला. इतर सात पुरस्कारांबरोबरच वैयक्तिक मलाही अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. या नाटकाचे ३७ प्रयोग झाले आहेत. मकरंद साठे लिखित व अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेलं ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक माझ्याासाठी विशेष महत्त्वाचे आहे. माहितीच्या अधिकारासंदर्भातलं ते नाटक होतं. चळवळीचं नाटक होतं. या नाटकात अलकाताई या नावाची माझी भूमिका होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, कणकवली, मावळ, पुणे, मुंबईतील गोरेगाव, माटुंगा, रायगड जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेले गागोदे, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, वडघर इत्यादी ठिकाणीच या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत तर केरळ राज्यातील तिरुअनंतपूर येथील राष्ट्रीय महोत्सवातही या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. या नाटकाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ३० पेक्षा अधिक प्रयोग या नाटकाचे झाले. मनोरंजनातून परिवर्तन घडवणारे हे नाटक आहे.
वीणाजी, तुम्ही चित्रपटाचा मोठा पडदाही व्यापून टाकलात, त्याबद्दल सांगा?
- राजेंद्र बडे लिखित, दिग्दर्शित ‘बेभान’ हा माझा पहिला चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील निशा या भूमिकेसाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मला मिळाला. २००८ मध्ये उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ या चित्रपटात तानीची भूमिका केली. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ या चित्रपटातही सीमा मावशी नावाची भूमिका केली. सतीश मनवर दिग्दर्शित ‘गाभ्रीचा पाऊस’ या त्याच्या पहिल्या चित्रपटात ‘अंजना’ ही शेतकर्याच्या बायकोची भूमिका केली. ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटात सावित्री नावाची भूमिका केली. याशिवाय ‘मर्मबंध’ हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा झीचा पुरस्कार मला मिळाला. ‘जन्म’ हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होत आहे, पण २०१० च्या राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण निर्मितीचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर हा चित्रपट आधारलेला आहे. मुलीला रक्ताचा कर्करोग होतो आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती आई किती धडपड करते हे या चित्रपटात दाखवलं आहे. कर्करोग झालेल्या मुलीची भूमिका मी केली आहे आणि माझ्या आईच्या भूमिकेत रिमा लागू आहेत. ‘लालबाग परळ’ चित्रपट मला खूप समाधान देणारा ठरला. जयंत पवार यांच्या ‘अधांवर’ या नाटकावर हा चित्रपट बेतला आहे आणि हे नाटक मी शाळेत असताना पाहिलं होतं. त्यातल्या मंजूच्या भूमिकेसाठी कुठलीही अभिनेत्री एका पायावर तयार झाली असती, इतकी सुंदर भूमिका आहे ती जयंत पवारांनीच अगदी सुरुवातीला माझं नाव महेश मांजरेकर यांना सुचवलं. या चित्रपटामुळे मला मांजरेकर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आलं. शिवाय ही भूमिका इतकी सशक्त होती की, ती साकारताना माझा खरा कस लागला. ‘पलतडचो मुनिस’ (पलिकडचा माणूस) या कोकणी भाषेतील चित्रपटात माझी एका वेड्या बाईची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट अनेक महोत्सवात गाजला. बर्लिन चित्रपट महोत्सवात या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला. टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला विशेष पुरस्कारही मिळाला. अशा प्रकारे चित्रपट क्षेत्रातही मी चमक दाखवू शकले, याबद्दल मला समाधान वाटते.
वीणाजी, तुम्ही लघु चित्रपटही केले त्याबद्दल सांगा?
- नंदू जाधव दिग्दर्शित ‘श्वेत अंगार’ या माझ्या लघु चित्रपटाचा २००७ साली फ्रान्सच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये समावेश झाला होता. ‘चंमतग्’ हा एक ४८ मिनिटांचा लघुचित्रपटही मी केला. ‘होले होले’ या हिंदी लघु चित्रपटातही मी भूमिका केली आहे. या माझ्या सर्व भूमिकांचे प्रचंड कौतुक झाले.
वीणाजी, टीव्ही माध्यमातून तुम्ही फारशा दिसत नाहीत, असं का?
- मला मालिकांच्या ऑफर्स बी.ए.ला असल्यापासून येत होत्या. झी मराठीवरील ‘घडलंय बिघडंल’ , ‘इ टीव्हीवरील पापण्यांना हसलात का?’ अशा मालिकांतून भूमिका केल्या. परंतु तेथे माझं मन रमलं नाही. तसेच चित्रपट नाटक यामुळे मला फारसा वेळ मिळत नाही, जो वेळ मिळतो तो मी वाचन-मननात घालवते, त्यामुळे मी टी.व्ही. मालिका फारशा करीत नाही.
वीणाजी, , तुमच्या एकंदरीत आयुष्याकडे पहाता तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं ध्येय कोणते आहे?
- मी स्वत:ला फार नशीबवान समजते कारण माझ्या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा होता. किंबहुना त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर येऊ शकले. नाट्य-चित्रपट क्षेत्रात खूप संघर्ष करणारे मी रोज पाहते. कित्येकांना घरचा पाठिंबा नसतो म्हणून काम करता येत नाही. सुदैवाने माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. मी अगदी लहानपणापासून काम करत गेले आणि मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या. उत्तम नाट्यसंस्था, दिग्दर्शक, सहकलाकार मला लाभले. प्रेक्षकांनाही माझं काम आवडलं. यापुढेही असंच चांगलं काम मला करायला मिळावं, हेच माझे ध्येय आहे.
खरेच, वीणा जामकर या विचारी, अभ्यासू अभिनेत्री आहेत. त्या बालपणी नकळत नाट्यक्षेत्रात ओढल्या गेल्या आणि कळत्या वयात त्यांनी आपल्या नाट्यक्षेत्रातील आणि चित्रपट क्षेत्रातील सहज वावराने कळस चढवला. आज त्या एक गुणी अभिनेत्री म्हणून परिचित आहेत, हा परिचय म्हणजेच त्यांच्या या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीला मिळालेली एक पावतीच आहे.
एक पायरी नाटकाची, एक पायरी चित्रपटाची. या पायर्यांवर मी कधी अडखळले नाही, पडले नाही. हा माझा प्रवास आवडीचा होता, त्यामुळे मी परिश्रम घेतले तरी माझी दमछाक झाली नाही. रंगभूमीवरील तिसर्या घंटेने माझ्या श्वासाला आत्मविश्वास दिला. माझ्या चित्रपटांना पडलेल्या टाळ्यांनी माझ्या अभिनयाला कौतुकाचा साज चढवला. आज जरी माझी ओळख नाट्य-चित्रपट विश्वात एक अभिनेत्री म्हणून असली तरी मी मात्र एक सच्ची कलायात्री आहे. माझा कलाप्रवास रसिकांच्या प्रेमामुळे सतत उंचावतच राहिला आहे, असे नाट्य-चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर म्हणतात, तेव्हा त्यांच्यातील कलाकाराचा आवाका अमर्यादित असल्याचे जाणवते.
वीणा जामकर. उरण येथील मनोहर जामकर यांच्या कलासक्त कन्या. चार दिवस प्रेमाचे, एक रिकामी बाजू दलपतसिंग येता गावा अशा व्यावसायिक नाटकांत आणि वळू, गाभ्रीचा पाऊस, विहीर, जन्म, लालबाग परळ अशा चित्रपटात आपल्या अप्रतिम अभिनयाने वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीने जो स्वत:चा ठसा उमटविला आहे, तो कधीही पुसला जाणारा नाही. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे वीणा जामकर यांनी एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजले आहेत. ‘पलतडचो मुनिस’ हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरांटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं. अशा या गुणी अभिनेत्रीबरोबरील ही गप्पांची मैफल.
वीणाजी, कलाक्षेत्रात तुम्ही कधी पाऊल टाकले?
- माझे संपूर्ण कुटुंबच कलासक्त आहे. माझी आई अलका जामकर शिक्षिका आहे आणि ती उत्तम गाते. ती नाटकात कामही करायची. माझे वडील चित्रकार आहेत. ते उत्कृष्ट तबला वाजवतात. अशा वातावरणात मी वाढले आहे. अडीच वर्षांची असताना मी पहिलं नाटक केलं. मग पाच वर्षाची असताना एकपात्री अभिनयही केला. आईच्या कडेवर बसून. त्या वयात आपले पालक आपल्याला सांगतात की, असं असं कर आणि आपण तसं करतो. तसं मी केलं आणि माझ्याही नकळत मला ते जमलं. लोकांना माझं काम आवडलं. आई-बाबांना आवडलं. त्यानंतर मग आई-बाबांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं. बाबा मला बालनाट्य शिबिरात घेऊन जायचे. मला नृत्याची आवड होती, म्हणूनच मला कथ्थक शिकायला पाठवलं. अभ्यास सांभाळून नाटक, नृत्य करायला मला आई-बाबांनी कायम प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत असताना ‘वैरी’ नावाची एकांकिका केली. त्या नाटकासाठी मला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बालकलाकाराचंही पारितोषिक मिळालं होतं. यानंतर पुढच्या काळात काही संस्थांच्या एकांकिका, उरणच्या संस्थांसाठी एकांकिका केल्या.
वीणाजी, नाटकात कारकीर्द करावी असं केव्हा ठरवलत?
- दहावी झाल्यानंतर मी ठरवलं की, याच क्षेत्रात काहीतरी करायचं, कारण नाटकात काम करणं मला मनापासून आवडत होतं. मला तेव्हा केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळण्याची सातवीपासून ते पदवीधर होईपर्यंत मला ती मिळणार होती. मात्र त्यासाठी दर दोन वर्षांनी मुलाखत द्यावी लागे. दहावीनंतर कमलाकर सोनटक्के यांनी माझी मुलाखत घेतली होती. ‘मला अभिनयाची आवड आहे, नाटकात काम करायचं आहे, मी काय करु? असं मी त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी मला मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मग मी रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला.
वीणाजी, रुपारेल कॉलेजचे व्यासपीठ तुमच्या कलेला कसे पोषक ठरले?
- रुपारेल कॉलेज एकूणच सांस्कृतिक घडामोंडीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असताना मग मी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. मी आणि अद्वैत दादरकरने एका युवा महोत्सवात शफाअत खानाची ‘क’ नावाची एकांकिका केली होती. तेव्ही मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. या स्पर्धेसाठी चेतन दातार परीक्षक होता. मला आणि अद्वैतला अभिनयासाठी सुवर्णपदकं मिळाली होती. चेतन दातारनं आमच्या या एकांकिकेचा प्रयोग ‘आविष्कार’ला ठेवला. मुंबईत येऊन तेव्हा मला दोन वर्षे झाली होती आणि ‘आविष्कार’मध्ये कसा प्रवेश मिळवायचा, याच धडपडीत मी होते आणि योगायोगाने १० जुलै २००३ रोजी, माझ्या वाढदिवशीच सुलभाताई देशपांडे यांच्यासमोर ‘आविष्कार’च्या रंगमंचावर एकांकिका सादर करण्याचे भाग्य मला लाभले.
वीणाजी, तुमचा आविष्कारच्या निमित्ताने जो प्रायोगिक नाटकांचा प्रवास झाला, तो कसा झाला?
- ‘क’ या एकांकिकेनंतर चेतन दातार याने ‘जंगल में मंगल’ हे नाटक केलं. ते माझं पहिलं प्रायोगिक नाटक. तेव्हा त्यातली एक प्रमुख भूमिका मला दिली होती. शेक्सपीअरच्या ‘अ मिडसमर नाईटस् ड्रीम’वर हे नाटक आधारित होतं. या नाटकाची मजा म्हणजे सर्व मुलांनी स्त्री भूमिका केल्या होत्या आणि सर्व मुलींनी पुरुषांची काम केली होती. माझ्या व्यक्तीरेखेचं नाव ‘पक्या’ होतं, म्हणजे मूळ नाटकातला ‘पक’ खूप एनर्जी असलेलं हे नाटक होतं. त्यानंतर ‘खेळ मांडियेला’ नावाचं नाटक केलं. चेतनने एका क्रोएशियन नाटकाचं हे भाषांतर केलं होतं. पं. सत्यदेव दुबे आणि सोनाली कुलकर्णी यांनी हे नाटक इंग्रजीत केलं होतं. मी आणि मंगेश भिडेने ते मराठीत केलं. एक व्यावसायिक नाटकातली मोठी अभिनेत्री आणि प्रायोगिक नाटकाचा दिग्दर्शक या दोन पात्राचं हे नाटक होतं. ही भूमिका तशी कठीण होती. तेव्हा मी फक्त एकोणीस वर्षांची होते. चेतनने भाषांतर व दिग्दर्शन करताना अनेक खरे संदर्भ वापरले होते. अनेक खर्या अभिनेत्रींच्या लकबी मला दिल्या होत्या. त्यावेळी जशी पेलली तशी मी ती भूमिका केली, पण माझं त्या भूमिकेमुळे खूप कौतुक झालं. त्या भूमिकेसाठी मला त्या वर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार’ आणि ‘मामा वरेरकर पुरस्कार’ असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.
वीणाजी, व्यावसायिक नाटकातही तुम्ही दमदार पदार्पण केलेत त्याबाबत सांगा?
- २००४ साली मी ‘एवढंच ना’ हे पहिले व्यावसायिक नाटक केले. यात माझी प्रमुख भूमिका होती. त्यानंतरचे दुसरे व्यावसायिक नाटक ‘चार दिवस प्रेमाचे’ सुयोगसारखी संस्था आणि प्रशांत दामले, सविता प्रभुणे, अरुण नलावडे हे सहकलाकार. खूप मजा यायची हे नाटक करताना या नाटकाचा शंभर प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘हिच ती दिवाळी’ या इरावती कर्णिक लिखित व अद्वैत दादरकर लिखित नाटकाच्या ३५ प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘एक रिकामी बाजू’ या नाटकातील भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. या नाटकात माझ्याबरोबर गीतांजली कुलकर्णी होती. स्तनाचा कर्करोग झालेल्या एका तरुणीची ही कथा होती. या नाटकात मी वेगवेगळ्या आठ भूमिका केल्या आहेत. थिट्रीक संस्थेच्या या नाटकास २००९ साली झी गौरवचा प्रायोगिक विभागाचा पुरस्कार मिळाला. इतर सात पुरस्कारांबरोबरच वैयक्तिक मलाही अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. या नाटकाचे ३७ प्रयोग झाले आहेत. मकरंद साठे लिखित व अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेलं ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक माझ्याासाठी विशेष महत्त्वाचे आहे. माहितीच्या अधिकारासंदर्भातलं ते नाटक होतं. चळवळीचं नाटक होतं. या नाटकात अलकाताई या नावाची माझी भूमिका होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, कणकवली, मावळ, पुणे, मुंबईतील गोरेगाव, माटुंगा, रायगड जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेले गागोदे, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, वडघर इत्यादी ठिकाणीच या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत तर केरळ राज्यातील तिरुअनंतपूर येथील राष्ट्रीय महोत्सवातही या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. या नाटकाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ३० पेक्षा अधिक प्रयोग या नाटकाचे झाले. मनोरंजनातून परिवर्तन घडवणारे हे नाटक आहे.
वीणाजी, तुम्ही चित्रपटाचा मोठा पडदाही व्यापून टाकलात, त्याबद्दल सांगा?
- राजेंद्र बडे लिखित, दिग्दर्शित ‘बेभान’ हा माझा पहिला चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील निशा या भूमिकेसाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मला मिळाला. २००८ मध्ये उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ या चित्रपटात तानीची भूमिका केली. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ या चित्रपटातही सीमा मावशी नावाची भूमिका केली. सतीश मनवर दिग्दर्शित ‘गाभ्रीचा पाऊस’ या त्याच्या पहिल्या चित्रपटात ‘अंजना’ ही शेतकर्याच्या बायकोची भूमिका केली. ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटात सावित्री नावाची भूमिका केली. याशिवाय ‘मर्मबंध’ हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा झीचा पुरस्कार मला मिळाला. ‘जन्म’ हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होत आहे, पण २०१० च्या राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण निर्मितीचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर हा चित्रपट आधारलेला आहे. मुलीला रक्ताचा कर्करोग होतो आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती आई किती धडपड करते हे या चित्रपटात दाखवलं आहे. कर्करोग झालेल्या मुलीची भूमिका मी केली आहे आणि माझ्या आईच्या भूमिकेत रिमा लागू आहेत. ‘लालबाग परळ’ चित्रपट मला खूप समाधान देणारा ठरला. जयंत पवार यांच्या ‘अधांवर’ या नाटकावर हा चित्रपट बेतला आहे आणि हे नाटक मी शाळेत असताना पाहिलं होतं. त्यातल्या मंजूच्या भूमिकेसाठी कुठलीही अभिनेत्री एका पायावर तयार झाली असती, इतकी सुंदर भूमिका आहे ती जयंत पवारांनीच अगदी सुरुवातीला माझं नाव महेश मांजरेकर यांना सुचवलं. या चित्रपटामुळे मला मांजरेकर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आलं. शिवाय ही भूमिका इतकी सशक्त होती की, ती साकारताना माझा खरा कस लागला. ‘पलतडचो मुनिस’ (पलिकडचा माणूस) या कोकणी भाषेतील चित्रपटात माझी एका वेड्या बाईची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट अनेक महोत्सवात गाजला. बर्लिन चित्रपट महोत्सवात या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला. टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला विशेष पुरस्कारही मिळाला. अशा प्रकारे चित्रपट क्षेत्रातही मी चमक दाखवू शकले, याबद्दल मला समाधान वाटते.
वीणाजी, तुम्ही लघु चित्रपटही केले त्याबद्दल सांगा?
- नंदू जाधव दिग्दर्शित ‘श्वेत अंगार’ या माझ्या लघु चित्रपटाचा २००७ साली फ्रान्सच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये समावेश झाला होता. ‘चंमतग्’ हा एक ४८ मिनिटांचा लघुचित्रपटही मी केला. ‘होले होले’ या हिंदी लघु चित्रपटातही मी भूमिका केली आहे. या माझ्या सर्व भूमिकांचे प्रचंड कौतुक झाले.
वीणाजी, टीव्ही माध्यमातून तुम्ही फारशा दिसत नाहीत, असं का?
- मला मालिकांच्या ऑफर्स बी.ए.ला असल्यापासून येत होत्या. झी मराठीवरील ‘घडलंय बिघडंल’ , ‘इ टीव्हीवरील पापण्यांना हसलात का?’ अशा मालिकांतून भूमिका केल्या. परंतु तेथे माझं मन रमलं नाही. तसेच चित्रपट नाटक यामुळे मला फारसा वेळ मिळत नाही, जो वेळ मिळतो तो मी वाचन-मननात घालवते, त्यामुळे मी टी.व्ही. मालिका फारशा करीत नाही.
वीणाजी, , तुमच्या एकंदरीत आयुष्याकडे पहाता तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं ध्येय कोणते आहे?
- मी स्वत:ला फार नशीबवान समजते कारण माझ्या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा होता. किंबहुना त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर येऊ शकले. नाट्य-चित्रपट क्षेत्रात खूप संघर्ष करणारे मी रोज पाहते. कित्येकांना घरचा पाठिंबा नसतो म्हणून काम करता येत नाही. सुदैवाने माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. मी अगदी लहानपणापासून काम करत गेले आणि मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या. उत्तम नाट्यसंस्था, दिग्दर्शक, सहकलाकार मला लाभले. प्रेक्षकांनाही माझं काम आवडलं. यापुढेही असंच चांगलं काम मला करायला मिळावं, हेच माझे ध्येय आहे.
खरेच, वीणा जामकर या विचारी, अभ्यासू अभिनेत्री आहेत. त्या बालपणी नकळत नाट्यक्षेत्रात ओढल्या गेल्या आणि कळत्या वयात त्यांनी आपल्या नाट्यक्षेत्रातील आणि चित्रपट क्षेत्रातील सहज वावराने कळस चढवला. आज त्या एक गुणी अभिनेत्री म्हणून परिचित आहेत, हा परिचय म्हणजेच त्यांच्या या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीला मिळालेली एक पावतीच आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा